बदायूंमधील हत्याकांडाच्या घटनेनंतर मुसलमान तरुणीने इस्लामचा त्याग करून स्वीकारला हिंदु धर्म !

बदायूंमध्ये २ धर्मांध मुसलमानांनी २ कोवळ्या हिंदु मुलांची क्रूरपणे केली होती हत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

सीतापूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील बदायूं येथे साजिद आणि जावेद या नराधमांनी आयुष अन् अहान नावाच्या २ कोवळ्या हिंदु मुलांची क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेमुळे अप्रसन्न (नाराज) होऊन सीतापूर जिल्ह्यातील हिना अली नावाच्या २० वर्षीय मुसलमान तरुणीने इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर हिनाने स्वतःचे संगीता असे नाव ठेवले आहे; कारण मृत मुलांच्या आईचे नाव संगीता असे आहे.

हिंदु तरुणाशी विवाह !

हिना अली ही सीतापूरमधील खैराबाद येथील रहिवासी आहे. हिनाची महेश नावाच्या हिंदु तरुणाशी मैत्री होती. या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. हिनाने महेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सीतापूर शहरातील कांशीराम कॉलनी येथील श्री कालिमाता मंदिरात हिना आणि महेश यांचा विवाह वैदिक पद्धतीप्रमाणे पार पडला.