प्रत्येक व्यक्तीस प्रभु श्री धनकुबेर यांचे आशीर्वाद लाभो ! – विनोद सिंह, अध्यक्ष, गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम

सौ. धनश्री केळशीकर यांचा श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रमाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार

पालघर – आपण केवळ दिवाळीत धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतो. काही जण वर्षभर अधूनमधून आर्थिक अडचण जाणवली, तर धनलक्ष्मीची पूजा करतात. वर्षभर काबाडकष्ट करूनही आपल्याला अपेक्षित धनप्राप्ती होत नाही; म्हणून प्रत्येक व्यक्तीस प्रभु श्री धनकुबेर यांचा आशीर्वाद लाभावा, यासाठी प्रभु श्री धनकुबेर यांची प्राणप्रतिष्ठा केल्याचे वाडाखडकोना श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रमचे अध्यक्ष विनोद सिंह यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील मुंबई-कर्णावती (अहमदाबाद) राष्ट्रीय महामार्गावर वाडाखडकोन मनोरजवळ श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात प्रभु श्री धनकुबेर यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी येथे माता चामुंडादेवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री खाटुराम यांचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. काही ग्रंथांमध्ये धनकुबेर यांना प्रसन्न करण्याचे महत्त्व आमचे मित्र एस्. मुलाणी यांच्याद्वारे आम्हाला लक्षात आले. त्यामुळेच आम्ही या देवतेची या परिसरात प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरवले. ‘जनतेने या ठिकाणी येऊन प्रभु श्री धनकुबेर यांची पूजाअर्चा करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत’, असे आवाहन श्री. विनोद सिंग यांनी केले.

या वेळी आश्रमाचे अध्यक्ष विनोद सिंह, मनोज सिंह, दिलीप सिंह, नितीन बोंबाडे, एस्. मुलाणी, हवालदार दुबे, माजी आमदार आनंद ठाकूर, माजी आमदार अमित घोडा, डॉ. ओमप्रकाश दुबे, प्रकाश दुबे, सुमित सिंह, विठ्ठल जोशी, हेमंत धर्ममेहेर, सुशील शहा, दिलीप सिंह, एस्. मुलाणी, नितीन बोंबाडे, सौ. धनश्री केळशीकर, प्रशांत पाटील, पंडित चव्हाण, प्रदुम शर्मा, सुमित गुप्ता, जे.पी. यादव, बॉबी वाल्मीकि, सचिन विष्ट, विशाल मदेशिया, सचिन विष्ट, विजय सिंह, राध्ये, श्याम मदेशिया, आिशष सिंह, भरत कचरे, सर्वेश तिवारी आदी उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी ‘वस्त्रसंहितेसह मंदिरांचे पावित्र्य राखणे आवश्यक !’, असे सांगितले.