हिंदु महिलांवरील प्रेम आणि विवाह यांच्याशी संबंधित अत्याचार

हिंदु मुलींना बाटवून मूळ हिंदु धर्मावर घाला घालण्याच्या षड्यंत्राला ‘लव्ह जिहाद’ म्हटले जाते. या भयावह प्रकारावर प्रकाश टाकणारा ‘ई-संस्कृती’च्या संकेतस्थळावरील हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

१. लव्ह जिहादची प्रकरणे

सौ. मीनाक्षी शरण

‘बीबीसी’च्या अहवालानुसार तरुण मुलींचा विनयभंग करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ब्रिटनमध्ये एका टोळीच्या (‘गँग’च्या) २० पुरुषांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी हे सर्व मूळ पाकिस्तानी असलेले ‘ब्रिटीश एशियन’ मुले तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार करत असत’, हे समोर आले. पंतप्रधान ऋषी सोनक यांनीही अशा टोळ्यांविषयी भाष्य केले आहे. ‘स्वराज्य’ या नियतकालिकाच्या वृत्तानुसार ब्रिटनमधील मूळ पाकिस्तानी असलेल्या तरुणांच्या या टोळ्या गेली ५० वर्षे तेथील शीख मुलींना लक्ष्य करत आहेत. ‘चंदीगड ट्रिब्यून’ या नियतकालिकच्या वृत्तानुसार पाकिस्तानी नेतृत्व असलेल्या टोळ्यांनी गेल्या १६ वर्षांमध्ये जवळपास १ सहस्र ४०० मुलींवर बलात्कार केला आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’मधील वृत्तानुसार देहलीमधील शहाबाद डेअरी भागामध्ये साहिल खान या २० वर्षांच्या तरुणाने एका १६ वर्षांच्या हिंदु मुलीवर १६ वेळा चाकूने वार केले. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार ती मुलगी साहिलशी संबंध ठेवू इच्छित नव्हती. खरोखर भारत पुन्हा मध्ययुगीन काळात जात आहे का ? मध्ययुगात जर इस्लामी आक्रमकांना एखादी स्त्री आवडली, तर कोणत्याही प्रकारे तिला जिंकून घेण्याचा ते प्रयत्न करत असत. राणी पद्मिनीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. चितोडगड किल्ल्यात तिने सहस्रावधी हिंदु स्त्रियांसमवेत ‘जोहार’ केला होता.

भारतात आज घडणार्‍या अशा प्रकारच्या बहुतांश घटनांमध्ये मुलगी हिंदु असते आणि मुलगा धर्मांध मुसलमान असतो. ज्या मुली धर्मांतर करून निकाह करण्यास सिद्ध होत नाहीत किंवा विरोध करतात, त्यांच्यावर अत्याचार केले जातात किंवा त्यांना ठार मारल्याच्या घटना समोर येतात.

२. अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत ?

चित्रपट अभिनेते शाहरूख खान, अमीर खान आणि सलमान खान यांनी वर्ष १९९० पासून बॉलिवूड क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अशा प्रकारचे विवाह होण्याचे प्रमाण अधिक वाढले. यांपैकी दोन चित्रपट अभिनेत्यांनी हिंदु मुलींशी विवाह केला, तर तिसर्‍या अभिनेत्याचा हिंदु मुलीशी विवाह झाल्यासारखाच आहे. अनेक चित्रपटांमध्ये ‘मुसलमान मुलगा हिंदु मुलीशी विवाह करतो’, असे दाखवण्यात आले आहे. तरुण आणि निष्पाप मुलांच्या मनावर बॉलिवूडचा अत्यधिक प्रमाणात प्रभाव आहे. त्यामुळे छोट्या शहरांतील मुली ‘मुसलमान मुलाशी विवाह करणे’, हे नवीन काहीतरी आहे’, असा विचार करू लागल्या. ‘कुरबान’ या चित्रपटामध्ये नायक हा अफगाणिस्तानमधील एक विवाहित गृहस्थ असतो. तो देहलीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागतो आणि एका हिंदु मुलीशी विवाह करतो. तिचा वापर तो अमेरिकेमध्ये स्थलांतरित होण्यासाठी करतो. त्यानंतर तो ‘आपल्या पत्नीने जिहादला पाठिंबा द्यावा’, यासाठी तिला ब्लॅकमेल करतो. हा चित्रपट पुष्कळ चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे; परंतु सर्वसाधारण माणूस या गोष्टीचा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करतो. त्याला वाटते की, ‘आपल्या मुलीच्या संदर्भात असे झाले तर ?’ बाहेरील वातावरण दूषित झाल्याने हिंदु मुलींचे पालक हे अधिक बचावात्मक पद्धतीने विचार करतात. ते आपल्या मुली मुलांच्या संपर्कात कमीत कमी येतील, याची काळजी घेतात. त्यामुळे अशा घरातील एखाद्या मुलीशी एखादा मुलगा पूर्वी कधीही न पाहिलेली प्रेमयाचना करतो, तेव्हा ती भारावून जाते. ती अशी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकत नाही आणि पुढे तिची त्या प्रियकरासमवेत पळून जाण्याची शक्यता वाढते. जर तो मुलगा मुसलमान असेल, तर परिस्थिती अजून बिकट होते. काही मुली स्वातंत्र्याच्या नावाखाली पालकांच्या विचारांकडे दुर्लक्ष करतात.

३. विशेष विवाह कायद्यानुसार विवाह का होत नाही ?

‘विशेष विवाह कायद्या’खाली जर विवाह केला, तर विवाह करणार्‍यांपैकी कुणालाही धर्मांतर करण्याची आवश्यकता नसते; परंतु मुसलमान मुलांच्या संदर्भात ते ‘निकाह’ हीच एकमेव पद्धत असल्याचे मानून निकाह करण्याचा आग्रह धरतात. काही हिंदु मुली स्वत:ची ‘हिंदु’ बाजू लावून धरतात. इतर मुली धर्मांतर करतात किंवा काही जणी स्वत:चे हिंदु नाव ठेवून धर्मांतर करतात.

४. हिंदु मुली चुकत आहेत का ?

हिंदु मुली चुकत आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे १८ वर्षांची गायिका सुनिधी चौहान ! तिने पळून जाऊन नृत्यदिग्दर्शक असलेल्या बॉबी खान याच्याशी विवाह केला आणि मुसलमान धर्मात धर्मांतर केले. तिच्या कुटुंबियांनी हा विवाह कधीच मान्य केला नाही आणि तिला स्वीकारलेही नाही. त्यानंतर एका वर्षात त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता तिने हितेश सोनिक याच्याशी विवाह केला आहे. अशा प्रकारच्या संबंधांमध्ये ‘मुसलमान धर्मात धर्मांतर करणे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल’, हा मूळ हेतू जाणण्यास हिंदु मुली अल्प पडतात. माझ्या एका अधिवक्ता मित्राच्या म्हणण्याप्रमाणे हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांमध्ये घटस्फोट होण्याचे कारण हे की, हिंदु मुलींचे संगोपन वेगळ्या पद्धतीने झालेले असते. हिंदु कुटुंबामध्ये मुलींना स्वातंत्र्य असते. त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते, तसेच त्या आर्थिक दृष्टीने स्वतंत्र होतात. एवढ्या सगळ्या घटना पाहूनही हिंदु मुली मुसलमान मुलांशी विवाह का करू इच्छितात ? असे का होते, यावर एखाद्याने संशोधन केले पाहिजे.

५. नेहमी मुसलमान मुलेच का दोषी असतात ?

१२.९.२०१२ या दिवशीच्या ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार ‘केरळमधील लव्ह जिहाद हा जागतिक स्तरावर इस्लामीकरण करण्याविषयीचा प्रकल्प आहे’, असे वक्तव्य जागतिक भारतीय ख्रिस्ती मंडळाने केले आहे. वर्ष २००९ मध्ये ‘केरळ कॅथॉलिक बिशप काऊन्सिल’ने म्हटले होते की, वर्ष २००६ पासून जवळजवळ २ सहस्र ६०० ख्रिस्ती मुलींचे मुसलमान धर्मात धर्मांतर करण्यात आले. १०.१२.२००९ या दिवशीच्या ‘इकॉनॉमिक टाईम्स’मधील वृत्तानुसार केरळमधील उच्च न्यायालयाने लव्ह जिहाद थांबवण्यासाठी कायदे करण्याविषयी सरकारला आदेश दिला होता. असे सर्व होऊनही हिंदु-मुसलमान विवाहाच्या घटना पहायला मिळतात. त्यांपैकी अगदी उच्च वर्गातील मुसलमानाचा हिंदु मुलीशी विवाह झाल्याची खालील काही उदाहरणे आहेत. सलमान खान यांचे वडील सलीम खान यांनी सुशिला चरक या हिंदु मुलीशी विवाह केला. त्यांचे नाव सलमा आहे. ‘टायगर पतौडी आणि हिंदु अभिनेत्री शर्मिला टागोर’, ‘क्रिकेटपटू महंमद अझरुद्दीन आणि अभिनेत्री संगीता बिजलानी’, ‘शाहरूख खान आणि गौरी छिब्बर’, ‘अमीर खान आणि किरण राव’, ‘जावेद अख्तर यांचा भाऊ सलमान आणि मोनिशा नायर’, ही अन्य उदाहरणे होत.

६. हिंदू आणि मुसलमान यांच्याशी संबंधित समाजव्यवस्थेविषयीचे प्रश्न कोणते आहेत ?

मुसलमान धर्मामध्ये मुलींमध्ये परदा किंवा बुरखा घालण्याची पद्धत असल्याने मुसलमान मुलांच्या त्यांच्या धर्मातील मुलींशी अल्प संबंध येतो. त्यामुळे महाविद्यालयात जाणारा मुसलमान मुलगा बहुतेक वेळा हिंदु मुलीशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतो. वर्ष १९४१ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी लिहिले आहे, ‘‘महिलांपासून पुरुषांना वेगळे ठेवल्यावर पुरुषांच्या नैतिकतेवर वाईट परिणाम होत असतो, हे सांगण्यासाठी कोणत्याही मनोविश्लेषण तज्ञाची आवश्यकताच नाही. महिला आणि पुरुष यांच्यामधील संबंध तोडणारी सामाजिक व्यवस्था धोकादायक लैंगिक संबंध अन् अनैसर्गिक आणि इतर वाईट सवयी निर्माण करते !’’ हिंदु आणि मुसलमान मुलींची तुलना करतांना आंबेडकरांनी म्हटले आहे, ‘‘हिंदु मुली बाहेर जाणार्‍या, अल्प धार्मिक, खुली मानसिकता असणार्‍या, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍या, तसेच शिक्षित असल्याने त्या बहुधा अधिक आकर्षक वाटतात. हे सर्व ठीक आहे; परंतु जेव्हा याचा परिणाम मुसलमान मुलाशी विवाह करण्यामध्ये होतो, तेव्हा हे प्रकरण क्लिष्ट बनते. एखाद्या विवाहाचा इतिहास अजून समस्या निर्माण करतो. उदा. अमीर खान यांच्या पूर्वीच्या दोन पत्नी रिना दत्त आणि किरण राव या हिंदु धर्माचेच अनुकरण करत आहेत. त्याचप्रमाणे अमीर खान यांची बहीण निखात हिने संतोष हेगडे यांच्याशी आणि दुसरी बहीण फरहात हिने राजीव दत्त यांच्याशी म्हणजे दोघींनीही हिंदु मुलांशी विवाह केला आहे. अशा प्रकारे भारतातील काही मुसलमान बिगर मुसलमानांना वाटणारी भीती किंवा समज घालवल्याचे दाखवून या समस्येमध्ये अजून वाढ करत आहेत. अशी माहिती लपवून ठेवण्याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. यामध्ये काही चुका असतील, तर त्या हेतूपूर्वक किंवा द्वेषपूर्वक केल्या आहेत, असे दाखवले जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमची बुद्धी वापरा आणि स्वतःचे मत सिद्ध करा !

– सौ. मीनाक्षी शरण, अध्यक्ष, अयोध्या फाऊंडेशन, देहली.

‘लव्ह जिहाद’वर प्रभावी उपाययोजना कोणत्या ?

या समस्येविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले पाहिजे, हे हिंदूंनी ओळखले पाहिजे. हिंदूंचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे धर्मयुद्ध आहे आणि त्यासाठी धैर्य, विश्वास आणि शत्रूची पूर्ण ओळख झाली पाहिजे. ट्विटरद्वारे आंदोलन, मेणबत्ती मोर्चा किंवा व्यथित कुटुंबासाठी निधी उभा करण्याने काही होणार नाही. आपल्याला एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सर्व आंतरधर्मीय विवाह हे विशेष विवाह कायद्याखाली झाले पाहिजेत. विवाह होण्याआधी कोणत्याही मुलीने स्वतःहून किंवा इतरांकडून दबाव आल्याने धर्म पालटू नये. सर्व विवाह, घटस्फोट आणि वारस यांच्यासाठी एक कायदा असण्याची आवश्यकता आहे. लोकांनी कोणताही धार्मिक सोहळा केला, तरी कायद्यानुसार सर्वांना समान अधिकार, उत्तरदायित्व आणि संरक्षण असण्याची आवश्यकता आहे. जरी एखादा मुलगा अल्पवयीन आहे आणि त्याने बलात्कार केला असला, तरी त्याला प्रौढ समजून दोषी ठरवले पाहिजे.  बलात्काराच्या खटल्यांमध्ये भारताच्या मुख्य न्यायाधीशांना त्याविषयी अहवाल देणारी ‘फास्ट ट्रॅक (जलदगती) न्यायालये’ चालू केली पाहिजेत. संबंधित खटले किती दिवसांत निकालात काढले पाहिजेत, याचा कालावधी निश्चित केला पाहिजे. ‘कायद्यानुसार दोषी ठरलेल्याला दंड आणि आजीवन कारावास’, हे दोनच पर्याय असले पाहिजेत. तुमच्या मुलींच्या जडणघडणीच्या काळात त्यांच्यामध्ये हिंदु धर्माविषयीची मूल्ये रुजवली गेली पाहिजेत. उपासना करतांना सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन ती केल्यास त्यांच्यामध्ये धर्माविषयीची दृढ श्रद्धा निर्माण केली पाहिजे. सनातन धर्म आणि इतर धर्म यांतील भेद त्यांना शिकवला पाहिजे. नुसती कल्पना देऊन नव्हे, तर घडणार्‍या घटनांविषयीची वस्तुस्थिती सांगून त्यांच्याशी खुली चर्चा केली पाहिजे. त्यांना सध्या असलेल्या कायद्यातील धोक्यांविषयीची जाणीव करून दिली पाहिजे. उदाहरणार्थ एक मुसलमान चार वेळा विवाह करू शकतो किंवा वारसा विषयीचे भेदभाव करणारे कायदे ! मुसलमान मुलाशी विवाह करण्यापूर्वी हिंदु मुलींना या सर्व गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजेत. त्यांना हिंदू आणि मुसलमान धर्मातील वारसा हक्काविषयीचे नियम समजले पाहिजेत. त्या मुलींमध्ये धर्माविषयीचा अभिमान आणि कुटुंबियांविषयीची मूल्ये रुजवून ‘माझ्या कुटुंबियांपेक्षा ‘अब्दुल’ महत्त्वाचा नाही’, अशी भावना निर्माण केली पाहिजे.