
नवी देहली – देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव केला जात असतांना फटाकेही तितक्याच प्रमाणात फोडले जात आहे. देशाची राजधानी देहलीसह अनेक शहरांमध्ये वायूप्रदूषणाने धोक्याची पातळी अनेक पटींनी ओलांडलेली असतांना देशवासियांकडून त्याकडे दुर्लक्ष करत फटाके फोडले जात आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असतांनाही देहलीसह अनेक शहरात ते धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देहली-एन्.सी.आर्. भागामध्ये फटाके फोडण्यावर बंदीच घातली आहे. तरीही येथे या आदेशाचे उल्लंघन करत फटाके फोडले जात आहेत. या संदर्भात पर्यावरणवादी भवरीन कंधारी यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात होते. पोलिसांत तक्रार करूनही काहीही उपयोग झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही. आदेशानुसार कार्यवाही करण्यात अधिकारी अपयशी ठरले आहेत. आता सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्सवाच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना प्रदूषित जीवन जगण्यास भाग पाडत आहोत, अशी टीका कंधारी यांनी केली.
संपादकीय भूमिका
|
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक