
नवी देहली – देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव केला जात असतांना फटाकेही तितक्याच प्रमाणात फोडले जात आहे. देशाची राजधानी देहलीसह अनेक शहरांमध्ये वायूप्रदूषणाने धोक्याची पातळी अनेक पटींनी ओलांडलेली असतांना देशवासियांकडून त्याकडे दुर्लक्ष करत फटाके फोडले जात आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असतांनाही देहलीसह अनेक शहरात ते धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देहली-एन्.सी.आर्. भागामध्ये फटाके फोडण्यावर बंदीच घातली आहे. तरीही येथे या आदेशाचे उल्लंघन करत फटाके फोडले जात आहेत. या संदर्भात पर्यावरणवादी भवरीन कंधारी यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात होते. पोलिसांत तक्रार करूनही काहीही उपयोग झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही. आदेशानुसार कार्यवाही करण्यात अधिकारी अपयशी ठरले आहेत. आता सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्सवाच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना प्रदूषित जीवन जगण्यास भाग पाडत आहोत, अशी टीका कंधारी यांनी केली.
संपादकीय भूमिका
|
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !