
नवी देहली – देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव केला जात असतांना फटाकेही तितक्याच प्रमाणात फोडले जात आहे. देशाची राजधानी देहलीसह अनेक शहरांमध्ये वायूप्रदूषणाने धोक्याची पातळी अनेक पटींनी ओलांडलेली असतांना देशवासियांकडून त्याकडे दुर्लक्ष करत फटाके फोडले जात आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असतांनाही देहलीसह अनेक शहरात ते धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देहली-एन्.सी.आर्. भागामध्ये फटाके फोडण्यावर बंदीच घातली आहे. तरीही येथे या आदेशाचे उल्लंघन करत फटाके फोडले जात आहेत. या संदर्भात पर्यावरणवादी भवरीन कंधारी यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात होते. पोलिसांत तक्रार करूनही काहीही उपयोग झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही. आदेशानुसार कार्यवाही करण्यात अधिकारी अपयशी ठरले आहेत. आता सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्सवाच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना प्रदूषित जीवन जगण्यास भाग पाडत आहोत, अशी टीका कंधारी यांनी केली.
संपादकीय भूमिका
|
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !