Pakistan India fishermen : पाकने ८० भारतीय मासेमार्‍यांची केली सुटका !

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तान सरकारने ८० भारतीय मासेमार्‍यांची सुटका केली. ते येथील मालिर कारागृहात होते. पाकच्या सागरी सीमेमध्ये मासेमारी केल्याच्या कथित आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना पंजाबमधील अटारी सीमेवरून भारतात पाठवण्यात येणार आहे.