निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४८

‘ताप आलेला असतांना शक्य असेल, तर एक वेळ काही न खाता उपवास करावा. उपवास करणे शक्य नसल्यास एका पातेल्यात थोडे तांदूळ नेहमीपेक्षा जरा जास्त पाणी घालून शिजवावेत आणि ते चांगले शिजले की, शिल्लक राहिलेले पाणी गाळून त्यात चवीपुरते मीठ घालून प्यावे. या पाण्याला ‘पेज’ असे म्हणतात. पेज प्यायल्याने लगेच तरतरी येते. १ – २ वेळा पेज प्यायल्याने थकवा निघून जातो आणि ताप लवकर बरा होण्यास साहाय्य होते. यानंतर भूक लागल्यास वरणभात, रव्याचा उपमा किंवा शिरा, तांदळाचे न आंबवता केलेले घावन, भाताच्या किंवा ज्वारीच्या लाह्या, मूगडाळ शिजवून तिच्यात चवीपुरते मीठ आणि गूळ घालून बनवलेले ’कढण’ असे पचायला हलके पदार्थ थोडीशी भूक शिल्लक ठेवून खावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe