अहिल्यानगर येथील कपिलेश्‍वर मंदिरातील शिवपिंडीवर धारदार शस्त्राने वार !

अहिल्यानगर – अज्ञात समाजकंटकांनी कपिलेश्‍वर मंदिरातील शिवपिंड धारदार शस्त्राने कापण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवपिंडीला तडे गेले आहेत. पिंडीची विटंबना झाली असल्याचे २३ ऑक्टोबरला सकाळी पूजा करतांना लक्षात आले. ही माहिती मिळताच बजरंग दलाचे कुणाल भंडारी, आमदार संग्राम जगताप, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी मंदिरात धाव घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे, तसेच संबंधित समाजकंटकांवर कारवाई न केल्यास २५ ऑक्टोबर या दिवशी शहर बंद ठेवण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे, हे गंभीर आणि सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !
  • वारंवार हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होणे, देवतांचे विडंबन होणे, हे थांबवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक !