मुंबई – महाराष्ट्रातील २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ५ नोव्हेंबर या दिवशी होणार आहेत. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ६ नोव्हेंबर या दिवशी मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस्. मदान यांनी केली. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ आहे. (नक्षलवादामुळे निवडणुका लवकर आटोपाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे चाललेल्या या परिस्थितीमध्ये कधी सुधारणा होणार ? साम्यवादपुरस्कर नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करावी ! – संपादक) सार्वत्रिक निवडणुकीसह २ सहस्र ९५० ग्रामपंचायत सदस्य आणि १३० सरपंच या पदांचीही पोटनिवडणूक ५ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे देणे, २३ ऑक्टोबर या दिवशी नामनिर्देशनपत्रांची पडताळणी, २५ ऑक्टोबर या दिवशी अर्ज मागे घेणे आणि निवडणूक चिन्हांचे वाटप असे नियोजन आहे, अशी माहिती आयुक्त यू.पी.एस्. मदान यांनी दिली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ५ नोव्हेंबर या दिवशी राज्यातील २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका !
५ नोव्हेंबर या दिवशी राज्यातील २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका !
नूतन लेख
- पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार डॉ. पाटकर यांना संजय राऊत धमकावत असल्याचा आरोप !
- मराठी माणसांना प्रवेश नाकारणार्या आस्थापनाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल ! – दीपक केसरकर, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र
- भाजप लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
- नालासोपारा येथे २ गायी कत्तलीसाठी नेतांना गोरक्षकांनी पकडले !
- अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव उत्साहात पार पडला !
- Police foil Naxal plot: गडचिरोली येथे पोलिसांनी घातपाताचा नक्षलवाद्यांचा डाव उधळला !