मणीपूर हिंसाचाराचे खटले गौहत्ती (आसाम) येथे चालणार

नवी देहली – मणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नोंदवलेले खटले आसामची राजधानी गौहत्ती येथे स्थलांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासाठी गौहत्ती उच्च न्यायालयाला एक अतिरिक्त विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा, तसेच या खटल्यांतील आरोपींना न्यायालयात ऑनलाईन उपस्थित करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.