(म्हणे) ‘प्राण देईन; पण देशाची फाळणी होऊ देणार नाही !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ईदनिमित्त मुसलमानांना भेटण्यासाठी आलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विधान !

कोलकाता (बंगाल) – आम्हाला बंगालमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला दंगली नको आहेत. (दंगलखोरांना पाठीशी घालून शांतता राखता येत नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे विधान म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे ! – संपादक) ज्यांना देश तोडायचा आहे, त्यांना मी ईदच्या निमित्ताने सांगू इच्छिते की, मी जीव द्यायला सिद्ध आहे; पण देशाची फाळणी होऊ देणार नाही, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २२ एप्रिल या दिवशी येथे रमझान ईदनिमित्त मुसलमानांना भेटण्यासाठी आल्या असतांना केले.

संपादकीय भूमिका 

ममता बॅनर्जी यांनी आधी बंगालमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी बोलावे ! तसेच बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान यांना हाकलून लावण्याविषयी त्या करत आहेत ?, याची माहिती द्यावी !