रामनवमीला देशभरात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या घटनांचे प्रकरण

नवी देहली – रामनवमीच्या दिवशी धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. ‘गुजरात, बंगाल, बिहार, झारखंड, कर्नाटक आणि तेंलगाणा येथील उच्च न्यायालयांत यासंदर्भात मागणी करा’, असा आदेश न्यायालयाने याचिकाकर्ते असलेले ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना दिला.
याचिकेतून धर्मांध मुसलमानांच्या विरोधात गंभीर आरोप !

जैन यांनी याचिकेत म्हटले होते की, प्रत्येक वर्षी धर्मांध मुसलमान हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करतात. हा मुसलमानांचा असा गट आहे, ज्याला हिंदूंची रामनवमी आवडत नाही. त्यामुळे ते नियोजित पद्धतीने हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करतात. जैन यांनी याचिकेद्वारे मागणी केली होती की, हिंसाचार घडवणार्यांवर कारवाई करण्यात येऊन संबंधित राज्यातील मुख्य सचिवांनी यासंदर्भात अहवाल जारी करावा. यासमवेतच न्यायालयाने संबंधित राज्य सरकारांना आदेश द्यावा की, त्यांनी हिंसाचारात प्राण गमावलेल्या अथवा घायाळ झालेल्या लोकांची किती हानी झाली, याचा आढावा घ्यावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली होती.
SC refuses to entertain pleas filed against Ram Navami violence, asks petitioners to approach respective high courtshttps://t.co/0Ts93z72Da
— OpIndia.com (@OpIndia_com) April 17, 2023
संपादकीय भूमिकाबहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंवर अल्पसंख्यांकांकडून झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी हिंदूंनाच मागणी का करावी लागते ? हे सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद ! |
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष