जम्मूमधील २ बाँबस्फोटांत ५ जण घायाळ !

घटनास्थळे

जम्मू – येथील नरवाल भागात २१ जानेवारीला झालेल्या २ बाँबस्फोटांमध्ये ५ जण घायाळ झाले. सध्या प्रजासत्ताकदिन आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मोठा बंदोबस्त असतांना ही घटना झाल्याने सुरक्षादल अधिक सतर्क झाले आहे. हे बाँबस्फोट नरवाल येथील ट्रान्सपोर्ट नगरच्या यार्ड क्रमांक ७ आणि ९ येथे झाले.

संपादकीय भूमिका

कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जम्मू-काश्मीरमधील अशा घटना थांबतांना दिसत नाहीत; त्याचे कारण म्हणजे या आतंकवादामागे असलेला पाकिस्तान आणि त्याची जिहादी मानसिकता ! या दोघांना नष्ट केल्यानंतरच काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !