सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘२३.५.२०२१ या दिवशी माझ्या मनाची स्थिती अस्थिर होती. त्या वेळी ध्यानमंदिरात गुरुदेवांशी आत्मनिवेदन करत असतांना त्यांनी सुचवलेली कविता त्यांच्याच चरणकमली अर्पण करते.

हे गुरुमाऊली, कृपेची सावली ।
ने मज दूर या मायारूपी भवसागरातूनी ॥
ध्यास लागो या जिवा, केवळ तुझ्या चरणांचा ।
आस लागो या मना, केवळ तुझ्या वरदहस्ताचा ॥ १ ॥
चित्त हरवू दे तुझ्या नेत्रांमध्ये ।
देह रंगू दे तुझ्याच भजनांमध्ये ॥
हृदयात राहो अखंड तुझेच ध्यान ।
स्मरणात असू दे सदा तुझे रूप महान ॥ २ ॥
मन होते रे विचलित या सर्वांतूनी ।
जेव्हा जन्मोजन्मीच्या स्वभावदोषांचे संस्कार येती उफाळूनी ॥
दे मजला बळ, या सर्व स्वभावदोषांशी लढण्यास ।
तेव्हाच होईन मी पात्र तुझ्या पावन चरणांची धूळ होण्यास’ ॥ ३ ॥
– कु. सायली पाटील, जळगाव (२३.५.२०२१)
| या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !