‘१६.६.२०२२ या दिवशी सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘शरणागती’ या सूत्रावरून घेतलेला एक भावप्रयोग ऐकल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्यानंतर मला पुढील पद्यपंक्ती सुचल्या.

गुरुदेवा, भक्तीची मज ओढ लागू दे ।
तव चरणांचा ध्यास लागू दे ॥ १ ॥
गुरुविण नको कुणी दुजे ।
अशी माझी वृत्ती घडू दे ॥ २ ॥

चरणप्राप्तीची तळमळ वाढू दे ।
मनी भाव असीम राहू दे ॥ ३ ॥
नेत्रांसी माझ्या केवळ तुज पाहू दे ।
ध्यानी माझ्या मूर्ती तुझी राहू दे ॥ ४ ॥
नको मायेचे हे जाळे ।
मन माझे मलाच छळे ॥ ५ ॥
मन माझे मंदिर बनावे ।
गुरुदेव नाथ (टीप १) त्यात विसावे ॥ ६ ॥
आहे सागर जो (टीप २) प्रीतीचा ।
तोचि अधिकारी (टीप ३) कृतज्ञतेचा’ ॥ ७ ॥
टीप १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
टीप २ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
टीप ३ : केवळ ज्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
– कु. सायली रवींद्र देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०२२)
| या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !