हिंदुविरोधी, देश तोडू पहाणारा आणि ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमंत्रण देणारा द्रमुक !

हिंदुविरोधी द्रमुकचा खरा चेहरा ओळखून हिंदूंनी त्याला निवडणुकीच्या माध्यमातून देशातून हद्दपार करायला हवे !

(द्रमुक – द्रविड मुन्नेत्र कळघम्, म्हणजे द्रविड प्रगती संघ)

‘जोपर्यंत तुम्ही हिंदु आहात, तोपर्यंत तुम्ही क्षुद्र आहात. तुम्ही हिंदु असेपर्यंत दलित आहात. जोपर्यंत तुम्ही हिंदु आहात, तोपर्यंत तुम्ही अस्पृश्य आहात. तुमच्यापैकी कुणी वेश्यांच्या मुलांसमवेत राहू इच्छिता का ? तुमच्यापैकी किती जण अस्पृश्य राहू इच्छिता ?  मी असा धर्म नाही पाहिला की, ज्यात कर्नाटकातील लिंगायत सर्वाेच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट करून म्हणतात, ‘आमची पूजा करण्याची पद्धत आणि सिद्धांत वेगळा आहे.’ लिंगायत ‘स्वतःला ‘हिंदु’ घोषित करू नये, अशी मागणी करत आहेत; परंतु सर्वाेच्च न्यायालय काय म्हणत आहे ? न्यायालय म्हणते, ‘तुम्ही मुसलमान, ख्रिस्ती किंवा पारशी नाहीत’, तर तुम्ही हिंदु असले पाहिजे.’ कोणत्या देशामध्ये अशी अमानुषता आहे का ? असे तुम्ही दरडावून विचारले, तरच सनातन धर्माची मुळे नष्ट होतील’, असे अतिशय वादग्रस्त आणि संतापजनक विधान तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम्चे (द्रमुकचे) खासदार ए. राजा यांनी केले; मात्र त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही; कारण एन्.व्ही. रामासामी पेरियार (पेरियार हे हिंदुद्वेषी व्यक्ती होते. वर्ष १८७४ ते १९७३ या त्यांच्या ९९ वर्षांच्या जीवनकाळात त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात द्वेष पसरवण्याचे कार्य केले) आणि त्यांची विचारधारा !

१. एन्.व्ही. रामासामी पेरियार म्हणजे जातीय नरसंहाराला उघड प्रोत्साहन देणारे व्यक्तीमत्त्व !

असे म्हणतात की, मनगटातील बळ संपले की, माणसाला जात आठवते. एन्.व्ही. रामासामी पेरियार, तर सदैव जातीचेच समाजकारण आणि राजकारण करत आले. त्यांना तमिळनाडूतील एकमेव दलित विचारवंत मानले जाते; पण एन्.व्ही. रामासामी पेरियार खुलेआम हिंदु आणि ब्राह्मण विरोधी द्वेष पसरवणारे तथाकथित दलित विचारवंत होते. ‘जर्मनीत हिटलरच्या नाझी सैन्याने ज्यूंच्या केलेल्या संहाराप्रमाणे भारतातही ब्राह्मणांची हत्या करावी’, असे त्यांचे मत होते. अर्थात् जातीय नरसंहाराला उघड प्रोत्साहन देणारे एन्.व्ही. रामासामी पेरियार यांचे व्यक्तीमत्त्व होते. तसेच पेरियार हे हिंदु देवीदेवतांचा अवमान करण्यातही सदैव अग्रेसर होते, त्यात त्यांना निराळाच आनंद लाभत असे.

२. हिंदुविरोधी विचारधारेसाठी प्रसिद्ध असलेल्या ए. राजा यांनी ‘तमिळनाडू देशा’ची मागणी करणे

तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् हा एन्.व्ही. रामासामी पेरियार यांच्या विचारांवरच चालणारा पक्ष आहे. द्रमुकचे प्रमुख ए.के. स्टॅलिन आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री असून त्यांचा पक्ष हिंदुविरोधी विचारधारेसाठी कुख्यात आहे. ए. राजा याच पक्षाचे खासदार असून द्रमुकच्या हिंदुविरोधी विचारधारेत तेही स्वतःचे जोरदार योगदान देत असतात. त्यांचे वरील विधान त्यासारखेच; पण याच ए. राजा यांनी काही दिवसांपूर्वी वेगळ्या ‘तमिळनाडू देशा’ची मागणी करत केंद्र सरकारला धमकी दिल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आताच्या हिंदुविरोधी विधानाकडे पाहिले पाहिजे.

३. द्रमुकच्या विचारधारेवरून तो पक्ष देशाचे तुकडे करू पहाणार्‍या टोळीचा सदस्य असल्याचे वाटणे

‘आपल्याला एन्.व्ही. रामासामी पेरियार यांच्या विचारांपासून प्रेरणा मिळाली आहे’, असे ए.राजा मानतात. पेरियार हिंदुविरोधी असण्यासह फुटीरतावादीही होते; कारण त्यांनीच सर्वप्रथम वेगळ्या तमिळनाडू देशाची मागणी केली होती. ए. राजा हेही त्यांच्या या सार्‍याच विचारांचे अनुयायी आणि अनुसरणकर्ते आहेत. त्यांच्या आताच्या विधानावरून आणि द्रमुकच्या विचारधारेवरून तो पक्ष ‘तुकडे-तुकडे गँग’चाच (देशाचे तुकडे करू पहाणारी कथित नेते, विचारवंत, देशद्रोही यांची टोळी) सदस्य असल्याचे स्पष्ट होते.

४. ‘तुकडे-तुकडे गँग’ने काश्मीरसह पूर्वोत्तरातील आणि दक्षिणेतील राज्ये यांना भारतापासून तोडण्याचे स्वप्न पहाणे

९० च्या दशकातील ‘तुकडे-तुकडे गँग’ने काश्मीर खोर्‍यात अराजक निर्माण केले. धर्मांध इस्लामी जिहाद्यांनी काश्मीर खोर्‍यातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, महिलांवर बलात्कार केले, लाखोंना जिवंत मारून टाकले. त्यानंतर गेल्या काही वर्षांत विविध विद्यापिठांतून ‘तुकडे-तुकडे गँग’ सक्रीय झाली आणि काश्मीरसह पूर्वोत्तरातील राज्यांनाही भारतापासून तोडण्याचे स्वप्न पाहू लागली. त्या पार्श्वभूमीवर आताचे ए. राजा यांचे हिंदुविरोधी आणि तमिळवादी विधान पाहिल्यास द्रमुकला दक्षिणेतही तीन दशकांच्या आधीच्या काश्मीर खोर्‍यासारखी परिस्थिती सिद्ध करायची असल्याचे दिसून येते. काश्मीरमध्ये इस्लामी कट्टरपंथियांनी हिंदूंचा नरसंहार करत तेथील लोकसंख्या संतुलन बिघडवले. तसाच प्रकार पेरियार यांच्या विचारांना आदर्श मानणारा द्रमुकही करू इच्छितो; पण एका सत्ताधारी पक्षाचा खासदारच उघडपणे हिंदुविरोधी आणि देश तोडण्याची विधाने करत असेल, तर ते गंभीरच !

५. भ्रष्टाचारी द्रमुकला नवीन काही देता येत नसल्याने त्याने जात आणि धर्म यांच्या नावावर जनतेतच संघर्ष निर्माण करणे

ए. राजा यांनी हिंदुविरोधी आणि स्वतंत्र तमिळनाडूवादी विधान करण्याचे मुख्य कारण म्हणजे नवीन काही करण्याची कुवत नसणे. एम्.के. स्टॅलिन यांच्यावर आणि त्यांच्या द्रमुक पक्षावर ते सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यांचे वडील एम्. करुणानिधी मुख्यमंत्रीपदी असतांनाही द्रमुक भ्रष्टाचारापासून मुक्त नव्हताच. त्यामुळे भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या द्रमुकला आधी आणि आताही नव्या काळातील नवी आव्हाने पेलता येत नाहीत.

मग काय करायचे ? तर जात आणि धर्म यांच्या नावावर जनतेतच संघर्षाची परिस्थिती निर्माण करायची. एका समाजाला दुसर्‍या समाजासमोर उभे करायचे आणि स्वतःचा राजकारणाचा स्वार्थ साधायचा, असे काम द्रमुककडून चालू आहे. खरे म्हणजे पेरियार यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक हिंदुविरोधी विचार मांडून दोन जातींत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्यानंतरच्या ३-४ पिढ्या येऊन गेल्या, तरी त्यांचे तेच विचार पुढे चालवले जात आहेत. त्यांना समाजाला नवे काही देताच येत नाही आणि ए. राजा यांच्या विधानामागे हेच कारण आहे.

६. द्रमुक पक्षाकडून ख्रिस्ती मिशनर्‍यांना धर्मांतर करण्यासाठी मोकळे रान मिळणे

ए. राजा यांच्या विधानाचे दोन उद्देशही दिसतात. तमिळनाडूतील अल्पसंख्य ख्रिस्ती समुदाय द्रमुकचा मतदार असून कोणत्याही परिस्थितीत तो द्रमुकला सोडून जाऊ शकत नाही. त्याचे कारण एम्.के. स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष ख्रिस्ती मिशनरी समर्थक आहे. त्यामुळेच ख्रिस्ती मिशनरी तमिळनाडूत धर्मांतराचा खेळ खेळायला स्वतंत्र असतात. याच धर्मांतराच्या खेळातून उद्भवलेले ‘लावण्या’ या शालेय मुलीच्या आत्महत्येचे प्रकरणही काही काळापूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. (लावण्या या विद्यार्थिनीला ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी वसतीगृहातून बळजोरी करण्यात आली होती.) त्यावरूनही उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यांनी द्रमुक सरकारला खडसावले होते; पण त्यातून धडा न घेता द्रमुकच्या ए. राजा यांनी धर्मांतराचा खेळ खेळणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना थेट आमंत्रणच दिल्याचे दिसते.

७. ए. राजा यांनी दलितांच्या मनात हिंदुद्वेष वाढवण्यासाठी चुकीची वक्तव्ये करणे

ए. राजा यांनी दलितांना ‘वेश्यापुत्र’ म्हणाल्याने ‘त्या समुदायातील लोक हिंदूंचा द्वेष करतील. अन्य जातींच्या विरोधात त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण होईल आणि त्याचा अपलाभ ख्रिस्ती मिशनर्‍यांनी घ्यावा’, असा ए. राजा यांचा डाव आहे. तथापि ए. राजा यांनी जे विधान केले, तसा उल्लेख कोणत्याही हिंदु धर्मग्रंथात नाही. तसेच भारतीय राज्यघटनेनेही दलित आणि मागास जाती यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आरक्षणासह ‘ॲट्रॉसिटी’ कायदाही केलेला आहे. तरीही ए. राजा चुकीची आणि खोटीनाटी माहिती पसरवत आहेत.

८. देश तोडण्याची भाषा करणार्‍या द्रमुकला काँग्रेसला पाठिंबा  का ?

नुकतीच राहुल गांधींनी तथाकथित ‘भारत जोडो’ यात्रेत ख्रिस्ती पाद्री जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली. त्यात जॉर्ज पोन्नैया यांनी ‘येशूच एकमेव ईश्वर आहे’, असे सांगून हिंदु देवीदेवतांना नाकारले आणि राहुल गांधी यांनीही ते ऐकून घेतले. तमिळनाडूत ए.के. स्टॅलिन यांच्या सत्ताधारी द्रमुकला काँग्रेसचा पाठिंबा आहे. त्या पक्षाचे एक खासदार हिंदुविरोधी आणि ख्रिस्ती मिशनर्‍यांना धर्मांतराचे आवताण (आमंत्रण) देणारे विधान करतात.

त्यातून लोकसंख्या संतुलन बिघडवण्याचे आणि वाढत्या ख्रिस्ती लोकसंख्येच्या माध्यमातून वेगळ्या तमिळनाडू देशाची मागणी पुढे रेटण्याचे त्यांचे कारस्थान असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत भाजपसह सर्वसामान्य हिंदू आणि देशभक्त द्रमुकचा विरोध करतीलच; पण द्रमुकशी आघाडी केलेली काँग्रेसही त्याचा विरोध करील का ? कि ‘भारत जोडो’ यात्रा काढत प्रत्यक्षात देश तोडणार्‍यांचे समर्थन करील ? त्याचे उत्तर ‘नवे विचार देण्याचे सामर्थ्य नसलेले द्रमुक-काँग्रेससारखे पक्ष, त्यांचे एम्.के. स्टॅलिन, ए. राजा, राहुल गांधी यांच्यासारखे नेते एकमेकांच्या हातमिळवणीतच समाधान मानतील’, असे वाटते.

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, १५.९.२०२२)