
कर्णावती (गुजरात) – पूर्वी असामाजिक घटक हिंसाचारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यावर काँग्रेस त्यांचे समर्थन करत असे; मात्र वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यावर गुन्हेगारांनी त्यांच्या कारवाया बंद केल्या. त्यानंतर भाजपने राज्यात कायमस्वरूपी शांतता निर्माण केली, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महुधा येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत केले. वर्ष २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती रेल्वेगाडीमध्ये कारसेवकांना जिवंत जाळण्यात आल्यावर राज्यात दंगल उसळली होती.
सौजन्य : NDTV
अमित शहा म्हणाले की, गुजरातमध्ये काँग्रेसच्या शासनाकाळामध्ये नेहमीच दंगली होत असत. काँग्रेस वेगवेगळ्या धर्मियांना आणि जातींना एक दुसर्याच्या विरोधात भडकावत होती. काँग्रेसने अशा माध्यमांतून मतपेढी भक्कम केली होती आणि समाजातील एका मोठ्या वर्गावर अन्याय केला होता. काँग्रेसचे समर्थन मिळत राहिल्याने गुन्हेगारांना सवय झाली होती. त्यामुळेच वर्ष २००२ मध्ये दंगल झाली; मात्र त्यांना धडा शिकवण्यात आल्यावर त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून दिला. आजपर्यंत ते हिंसाचारापासून दूर आहेत.
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !