पुणे, संभाजीनगर आणि जालना या ३ शहरांत गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेची चेतावणी !

‘तबलिगी जमात’ आणि ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या जिहादी संघटनांनी स्वतःचे केंद्र बनवले !

मुंबई – ‘तबलिगी जमात’ आणि ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ (जे.यू.एच्.) या संघटनांनी पुणे, संभाजीनगर आणि जालना शहरांत स्वतःचे केंद्र बनवले आहे. या संघटनांच्या वतीने जालना आणि संभाजीनगर येथे सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. या संघटना अत्यंत गुप्तपद्धतीने आखणी करत आहेत, ज्यामुळे विघातक कारवायांचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणांना (‘एन्.आय.ए.’ना) अमरावती येथील उमेश कोल्हे यांची जिहाद्यांनी केलेल्या हत्येच्या प्रकरणी आरोपींची चौकशी करतांना ‘तबलिगी जमात’ आणि ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनांविषयी वरील माहिती मिळाली.

संपादकीय भूमिका 

यंत्रणांनी केवळ सतर्कतेची चेतावणी देणे पुरेसे नसून या जिहादी संघटनांची पाळेमुळे नष्ट करून जनतेला आश्वस्त करणे आवश्यक आहे !