विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी वारकर्‍यांचा पुढाकार अपेक्षित !

 

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी आणि विठ्ठल मंदिर

‘येत्या ७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहेत. नवी देहली येथे या संदर्भात ११ सप्टेंबर २०२२ या दिवशी कायदेतज्ञांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर डॉ. स्वामी यांनी हे घोषित केले. (देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)’