‘घरवापसी’चा आदर्श निर्माण करणार्‍या जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी) यांचे विचार !

जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी)

‘पूर्वीच्या काळी मनुष्याला संपवण्यासाठी राक्षसी शक्ती कार्यरत होत्या. आता ते राक्षस कट्टरपंथियांच्या रूपात कार्यरत असून आपण त्यांना आतंकवादी म्हणतो. सर्वांत पुरातन अशा सनातन धर्माला संपवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे; मात्र आम्ही त्यांना हिंदु धर्मात प्रवेशाचा मार्ग दाखवल्यामुळे आज अनेकजण हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छित आहेत. ते मिळून मिसळून राहू इच्छितात; मात्र हिंदु धर्मात प्रवेश केल्यावर कट्टरपंथियांपासून छळ होण्याची त्यांना भीती आहे; मात्र ही भीतीही आता न्यून होत आहे. हिंदु धर्मात परत येऊ इच्छिणार्‍यांचे पूर्वी तलवारीच्या बळावर बलपूर्वक धर्मांतर झाले होते; मात्र ते आता हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत. आता हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे.’