प्रत्युत्तरासाठी भारताकडून ‘मिग-२९’ आणि ‘मिराज २००’ यांसारखी लढाऊ विमाने तैनात !

लडाख – गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून चीनची लढाऊ विमाने पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्याला चिथावण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून चिनी विमाने उड्डाण करत आहेत. भारतीय हवाई दलही चीनच्या या खेळीला चोख प्रत्युत्तर देत आहे. भारतीय हवाई दलाने ‘मिग-२९’ आणि ‘मिराज २०००’ यांच्यासह सर्वांत शक्तिशाली लढाऊ विमाने तळांवर तैनात केली आहेत. चीनने भारताची हानी करण्याचा प्रयत्न केला, तर ही लढाऊ विमाने काही क्षणांत चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देऊ शकतात.
सौजन्य : India Today
लडाख सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवरून चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ तणावात असल्याचे दिसते. या पायाभूत सुविधांमुळे भारतीय हवाई दलाला चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे याच मासात १७ जुलै या दिवशी दोन्ही देशांची ‘कॉर्प्स कमांडर चर्चा’ झाली होती. यानंतरही चीनने त्याच्या कारवाया चालूच ठेवल्या आहेत.
संपादकीय भूमिकाचिनी ड्रॅगनच्या अशा कुरापतींना ठोस प्रत्युत्तर देण्यासमवेतच ‘तो कुरापती काढणारच नाही’, अशी कणखर भूमिका भारताने घ्यावी, ही अपेक्षा ! |
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin