जाचक अटी रहित करून शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचे अनुदान द्या ! – आमदार आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना आमदार प्रकाश आबिटकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना खासदार धैर्यशील माने

कोल्हापूर, १३ जुलै (वार्ता.) – राज्यात प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांच्या अनुदानासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी रहीत करून शेतकर्‍यांना थेट ५० सहस्र रुपये अनुदान देण्यात यावे, यांसाठी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, तसेच शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन १२ जुलै या दिवशी निवेदन सादर केले. निवेदनानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचे अनुदान देण्यासाठी कटीबद्ध आहे’, असे आश्वासन दिले, असे आबीटकर यांनी पत्रकारांना सांगितले.