कानपूर येथील हिंसाचाराच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

कानपूर येथील हिंसाचार

कानपूर (उत्तरप्रदेश) – नूपुर शर्मा प्रकरणी कानपूर येथे ३ जून या दिवशी धर्मांधांनी हिंसाचार केला होता. याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असतांना हिंसाचाराच्या वेळी सतत पाकिस्तानशी दूरभाषवरून संपर्क केला जात होता, असे समोर आले आहे.

ज्या क्रमांकावरून संपर्क केला जात होता, तो सराईत गुंड अतिक खिचडी याचा असल्याची माहिती मिळाली आहे. अतिक हिंसाचाराच्या दिवसापासून पसार आहे.

संपादकीय भूमिका

पाकमधून भारतात हिंसाचार घडवण्यात येत असेल, तर भारताची अंतर्गत सुरक्षा किती कुचकामी आहे, हे लक्षात येते ! उद्या पाकशी युद्ध झाल्यास धर्मांध अशा प्रकारचे उठाव करू लागले, तर ते पोलिसांना पेलवणार आहे का ? याचा विचार आतापासूनच केला पाहिजे !