समस्तीपूर (बिहार) येथे संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आढळली स्फोटके !

मोठी दुर्घटना टळली

समस्तीपूर (बिहार) – येथे संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या वातानूकुलित डब्यात आयईडी स्फोटके सापडली. पोलिसांनी ही स्फोटके कह्यात घेतली आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ समाजकंटकांनी नुकतीच  हीच गाडी पेटवून दिली होती. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक हृदयकांत यांनी दिली. ही स्फोटके इतकी शक्तीशाली होती की, त्यांचा स्फोट झाला असता, तर संपूर्ण रेल्वेगाडीच्या चिंधड्या उडाल्या असत्या, तसेच स्थानकाच्या आजूबाजूच्या घरांचीही हानी झाली असती.

संपादकीय भूमिका

यावरून ‘विद्यार्थ्यांच्या नावाखाली चालू असलेल्या या आंदोलनात आता नक्षलवादी आणि आतंकवादी यांनी शिरकाव केला आहे’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?