समस्तीपूर (बिहार) येथील गरिबीमुळे ब्राह्मण कुटुंबातील ५ जणांच्या आत्महत्येवर राजकीय पक्षांचे मौन !

समस्तीपूण (बिहार) – येथे काही दिवसांपूर्वी मनोज झा या ब्राह्मण कुटुंबातील ५ जणांना गरिबीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने त्याविषयी विशेष संवेदनशीलता दाखवलेली नाही. बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले होते; मात्र त्यांनी या कुटुंबांची जात सांगण्याचे टाळले होते.

संपादकीय भूमिका 

  • ‘गरिबीमुळे एखाद्या दलित कुटुंबाने आत्महत्या केली असती, तर आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी अश्रू ढाळले असते; मात्र येथे ब्राह्मणांनी आत्महत्या केल्यानेच सर्व मौन आहेत’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?
  • आरक्षणाचा लाभ घेऊन बरेच मागासवर्गीय सधन झाले आहेत. त्यामुळे आता केवळ आर्थिक स्तरावर मागास असलेल्यांसाठी योजना चालू करण्याची आवश्यकता आहे, हे या घटनेतून लक्षात येते !