शिखांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवले, तरच देशावर शिखांचे राज्य येईल !

श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांचे शिखांना आवाहन

अमृतसर (पंजाब) – येथील श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी शिखांना आवाहन केले आहे, ‘वर्ष १९४७ नंतर शिखांना दाबण्याचे धोरण राबवले गेले. धार्मिक आणि राजकीय स्वरूपामध्ये शिखांना दुर्बल बनवण्यात आले. आता त्यांनी सक्षम होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवावे, तेव्हाच देशावर शिखांचे राज्य येईल.’ गेल्या मासामध्ये ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी शिखांना स्वतःजवळ परवाना असलेली आधुनिक शस्त्रे बाळगण्याचे आवाहन केले होते.

ते पुढे म्हणाले की, सध्या ख्रिस्त्यांचा प्रचार जोरात चालू आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याला संघटित होऊन मैदानात उतरले पाहिजे. गावागावांत जाऊन आवाज उठवायला हवा. जर आपण धार्मिक स्वरूपात सशक्त झालो नाही, तर आर्थिक स्वरूपात शक्तीशाली बनू शकणार नाही आणि त्यामुळे राजकीय स्वरूपातही दुर्बल बनून राहू.

संपादकीय भूमिका

  • प्रत्येकालाच या देशावर त्यांच्या धर्माचे राज्य असायला हवे, असे स्वप्न पडत आहे. त्यामुळे हिंदूंनी त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लवकरात लवकर संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !