#Gudhipadva : हिंदूंनो, नववर्षारंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेसच का ?

जाणून घ्या कारणे !

नैसर्गिक

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत-‘संपाता’वर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) अन् वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (अध्याय १०, श्लोक ३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक आणि आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते.

आध्यात्मिक

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ चालू झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

ऐतिहासिक

अ. या दिवशी रामाने वालीचा वध केला.
आ. या दिवशी शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
इ. या दिवसापासूनच ‘शालिवाहन शक’ चालू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

हिंदूंनो, पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करा; कारण स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचे पालन करण्यातच आपले खरे हित आहे !

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष