अण्णा हजारे यांच्याकडून सत्याग्रह आंदोलनाची चेतावणी

नगर – महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांचे लोक आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून शेतकर्यांनी त्यांचे भागभांडवल अन् भूमी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेऊन अनुमाने २५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केला आणि सहकार क्षेत्र मोडीत काढून खासगीकरण वाढीला लावले. याविषयी चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे. या पत्राची प्रतिलिपी (सीसी कॉपी) अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवली आहे. याविषयी अण्णांनी २४ जानेवारी या दिवशी राळेगणसिद्धीमध्ये माध्यमांशी बोलतांना सहकारी साखर कारखाने विक्री घोटाळ्यावर भाष्यही केले.
‘साखर कारखाने बंद पडले नाहीत, तर बंद पाडले गेले’, असा आरोप करत या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा मी माझ्या मार्गाने मी जाईन’, असे सांगत अण्णांनी सत्याग्रह आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !