
‘स्वातंत्र्य’ हा शब्द चांगलेपणाचे द्योतक आहे; मात्र कुणी सृष्टीच्या नियमाच्या / स्वातंत्र्याच्या विरुद्ध वागला, तर ते घातक आहे. यासाठी ‘स्वातंत्र्य कुणाला दिले पाहिजे ?’, हे स्पष्ट केले पाहिजे. ‘वाईट शक्तींना प्रोत्साहन देणे’ म्हणजे स्वातंत्र्य नव्हे !
स्वातंत्र्य = स्व + तंत्र. स्व म्हणजे आत्मा. तो शुद्ध, शाश्वत आणि चैतन्यमय आहे. त्यानुसार घेतलेला निर्णय सत्य आणि आनंद देणारा असतो. त्यामुळे त्याद्वारे झालेले मार्गदर्शन म्हणजे स्वातंत्र्य होय. स्व म्हणजे आत्मा, म्हणजेच भगवंत आणि स्वातंत्र्य म्हणजे भगवंताच्या इच्छेने होणारे कार्य ! चैतन्य हे भगवंताचे अस्तित्व असून शरीर हे त्याने दिलेले यंत्र आहे. त्याद्वारे ईश्वराची प्राप्ती होते. मानवी जीवनाचे ध्येय असलेली ईश्वरप्राप्ती सहज-सुलभपणे होण्यासाठी साधना हा मार्ग आहे आणि तो मार्ग निर्विरोध होणे म्हणजे खरे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. – (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१२.२०१८)
| वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !