
कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्रात जवळपास २ मासांपासून ‘एस्.टी.’ कर्मचार्यांचा संप चालू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांचे ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमीवर लक्ष असून ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्यांचा संप लांबवला जात आहे, असा आरोप भाजपचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘एस्.टी.’ कर्मचारी हे केवळ सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सुविधा चालू करा, असे म्हणत आहेत, यात चूक काय आहे ? महाविकास आघाडीला ‘एस्.टी.’चे जाळे मोडून काढायचे आहे आणि कोणत्यातरी खासगी वाहतूकवाल्यांशी कंत्राट झाले आहे. त्यामुळेच ‘एस्.टी.’च्या संपावर तोडगा काढण्यात येत नाही.’’
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !