
कोल्हापूर, ११ जानेवारी – जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर मिळालेल्या विजयाविषयी कोरोना नियमांचा भंग करून मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी सार्वजनिक आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह ४०० कार्यकर्त्यांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जयसिंगपूर येथील क्रांती चौक ते गल्ली क्रमांक ६ येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘जेसीबी’च्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली. अशाच प्रकारे शाहूवाडीत मिरवणूक काढून रणवीर गायकवाड यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकीकडे राज्यशासन वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आणि नियम पाळण्याचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री अन् लोकप्रतिनिधीच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पायमल्ली करत आहेत. अशा उदहारणांवरून राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांच्या जिवाची किती पर्वा आहे ? हेच सिद्ध होते.
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
संपादकीय : सत्तापिपासू तृणमूल बंडखोर !