
कोल्हापूर, ११ जानेवारी – जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर मिळालेल्या विजयाविषयी कोरोना नियमांचा भंग करून मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी सार्वजनिक आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह ४०० कार्यकर्त्यांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जयसिंगपूर येथील क्रांती चौक ते गल्ली क्रमांक ६ येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘जेसीबी’च्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली. अशाच प्रकारे शाहूवाडीत मिरवणूक काढून रणवीर गायकवाड यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकीकडे राज्यशासन वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आणि नियम पाळण्याचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री अन् लोकप्रतिनिधीच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पायमल्ली करत आहेत. अशा उदहारणांवरून राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांच्या जिवाची किती पर्वा आहे ? हेच सिद्ध होते.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न