
पाटलीपुत्र (बिहार) – आज मुली विवाहासाठी पालकांच्या संमतीविना घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम दिसून येतात. यांतील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. या सर्वाची किंमत पालकांना मोजावी लागते, असे विधान बिहारचे पोलीस महासंचालक एस्.के. सिंघल यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘समाज सुधार अभियान’ राबवत आहेत. हे अभियान सध्या समस्तीपूर येथे चालू आहे. त्याच व्यासपिठावरून लोकांना संबोधित करतांना एस्.के. सिंघल यांनी हे वक्तव्य केले आहे.
#Bihar के DGP #SKSinghal ने लड़कियों की #Marriage को लेकर क्या नसीहत दी ? #Parents को भी दी Advice
सब्सक्राइब करें #TimesNowNavbharat 👉 https://t.co/ogFsKf9YX1#TimesNowNavbharatOriginal #BiharPolice #SamajSudharAbhiyan #DGPSKSinghal #Samastipur pic.twitter.com/OVokJqYU9S
— Times Now Navbharat (@TNNavbharat) December 31, 2021
पालकांनाही सल्ला देतांना सिंघल म्हणाले की, पालकांनी त्यांच्या मुला-मुलींशी समान संवाद साधला पाहिजे. त्यांनी मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत. पालकांनी मुलांच्या भावना समजून घेतल्या, तर ते त्यांच्याशी जोडलेले रहातात. असे केल्यास पालक चांगल्या समाजाच्या जडणघडणीत हातभार लावू शकतील.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन