|

पिलिभीत (उत्तरप्रदेश) – म. गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ‘गोडसे जिंझाबाद’ बोलणार्या लोकांना फाशी दिली पाहिजे. भगवान श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचे काम केले, त्या गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ हा ट्रेंड केला जातो (ट्विटरवर चर्चा घडवून आणली जाते), अशी टीका भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी येथे केली. ते त्यांच्या पिलिभीत मतदारसंघात अंगणवाडी सेविका आणि अन्य महिला कर्मचारी यांच्याशी संवाद साधत होते.
वरुण गांधी पुढे म्हणाले की, मी येथे काही मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आलेलो नाही. मी देशाचे राजकारण करायला आलो आहे. आज माझ्यासमोर पूर्ण देश बसला आहे. माझ्यासमोर ना कुणी हिंदू आहे ना कुणी मुसलमान, ना कुणी पुढारलेला आहे, ना कुणी मागास. असा भेद करून आपण भारताला दुर्बल करत आहोत. आता ‘जय श्रीराम’ नाही, तर ‘जय हिंद’ म्हणायची वेळी आली आहे.
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला