धर्मांधांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

राष्ट्रप्रेमी संघटनांकडून नागपूर, कारंजा आणि वाशिम येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन !

कारंजा येथील तालुका दंडाधिकार्‍यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

नागपूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगाव, मनमाड, अमरावती, हिंगोली, नांदेड आणि ईश्वरपूर (जिल्हा सांगली) आदी ठिकाणी धर्मांधांनी १२ नोव्हेंबर या दिवशी नमाजानंतर मोर्चा काढून दंगल घडवली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करावी आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घालावी, या मागणीसाठी नागपूर आणि कारंजा (जिल्हा वाशिम) येथे स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. तसेच हिंदु समाजाची अपकीर्ती करून ‘हिंदुफोबिया’ निर्माण करू पहाणार्‍या काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घालावी, तसेच सलमान खुर्शीद यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी नागपूर आणि वाशिम जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी कारंजा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोरक्षा समिती आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.