जातीयवादी शक्ती परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – शरद पवार

राज्यातील हिंसाचाराचे प्रकरण

शरद पवार

नवी देहली – त्रिपुरामध्ये जे झाले, त्यानंतर महाराष्ट्रात जे करण्यात आले, ते धर्मांध शक्तींमुळे झाले आहे. देशात धर्मांध शक्तींचे आव्हान आहे. जातीयवादी शक्ती परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. नवी देहली येथे पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील दंगलसदृश्य परिस्थितीविषयी त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

या वेळी भाजपवर टीका करतांना पवार म्हणाले, ‘‘ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा अपवापर कसा केला, हे जनतेने पाहिले आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून भाजप महाविकास आघाडीवर आरोप करत आहे. त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या सूत्रांवर भारत सरकारने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.’’