जळगाव येथे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून १ सहस्र ५०० किलोचा गांजा जप्त !

जळगाव – मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने (‘एन्.सी.बी.’ने) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ तब्बल १ सहस्र ५०० किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. या वेळी २ आरोपींना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले. विशाखापट्टणम्चा (आंध्रप्रदेश) या प्रकरणाशी असलेला संबंध समोर आला आहे. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या ३ सहस्र किलोग्रॅम अमली पदार्थ प्रकरणातही विशाखापट्टणम्चा संबंध आढळला होता.