आर्थिक संकटात असतांना चारचाकी गाडी विकणे, तिचे पूर्ण पैसे न मिळणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्ततेने प्रार्थना केल्यावर २ दिवसांत उरलेले पैसे आणून देणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आम्ही काही दिवस आर्थिक संकटात होतो. त्या वेळी मी ‘धनाची व्यवस्था कशी होईल ?’, याचा विचार करत होतो. आम्ही मार्च मासात आमची ‘सँट्रो’ ही चारचाकी गाडी विकली. तेव्हा त्या वाहनाचे १ लक्ष २५ सहस्र रुपये मिळाले. त्यांतील १९ सहस्र रुपये येणे बाकी होते. गाडी विकत घेणार्‍याने ‘पुढील मासात पैसे देतो’, असे वचन दिले होते; परंतु त्याला दळणवळण बंदीमुळे पैसे देणे जमले नाही. आम्ही त्याला त्याविषयी अनेकदा सांगितले, तरी तो पैशांची व्यवस्था करू शकत नव्हता. तेव्हा आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना आर्ततेने प्रार्थना केली आणि १ – २ दिवसांत त्या व्यक्तीने उरलेले पैसे आणून दिले. तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. अभिषेक अवस्थी, कानपूर, उत्तरप्रदेश. (१३.११.२०२०)