‘लहानपणीचा काळ कधी निघून गेला, हे कळलेही नाही. संसारात पडल्यावर एक-एक दिवस घालवणे कठीण झाले. वयाच्या ४३ व्या वर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर त्यांचा सत्संग आणि त्यांची अपार कृपा यांमुळे त्यानंतरची ३२ वर्षे आनंदात कधी गेली, हे मला कळलेच नाही. पूर्वी मला वाढदिवस, त्याचे महत्त्व इत्यादींविषयी ठाऊक नव्हते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आयुष्याच्या कालगणनेचे महत्त्व कळले. वयाच्या ४३ ते ७५ व्या वर्षांपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी मला चैतन्यामृत दिले. ‘हाच माझा अमृत महोत्सव आहे’, असे मला वाटते. मी माझे अनुभव परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करतो.

लहानपणीचा काळ खेळण्या बागडण्याचा ।
संसाराचा काळ सुख-दुःख झेलण्याचा ।
मनुष्यजन्माचा काळ अती मोलाचा ।
साधना करूनी गुरुकृपेने मोक्षप्राप्ती करण्याचा ।। १ ।।
पश्चात्ताप करत भूतकाळात रमू नका ।
चिंता करत भविष्याचा विचार करू नका ।
वर्तमानकाळातील आनंदाला मुकू नका ।
आपत्काळी भक्ती वाढवल्याविना राहू नका ।। २ ।।
मायेच्या विळख्यात सापडू नका ।
साधनेचा मार्ग कुणी सोडू नका ।
साधकांवर प्रीती केल्याविना राहू नका ।
चुका करणार्यांना शिक्षा दिल्याविना सोडू नका ।। ३ ।।
मनुष्यजन्म वाया घालवू नका ।
शिकणे नि शिष्यपद सोडू नका ।
चैतन्याला कधीच विन्मुख होऊ नका ।
गुरुकृपायोगाचा विहंगम् मार्ग सोडू नका ।। ४ ।।
वयाची पंचाहत्तरी मी गाठली ।
विनवितो साधकांसी मी हात जोडूनी ।
माझ्या अभिवादनासाठी वेळ घालवू नका ।
परम पूज्यांचे चरण (टीप १) कधीच सोडू नका ।। ५ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरुचरण
(पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.५.२०२१)
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : अज्ञानतिमिराचा नाश करणारे ज्ञानस्वरूप गुरुदेव !
गुरु सगुण रूप, तर ‘गुरुपादुका’ हे गुरूंची आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य प्रसारित करणारे त्यांचे निर्गुण स्वरूप आहे !