|

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ६ दिवसांत काश्मिरी हिंदु आणि शीख नागरिकांची आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यानंतर सुरक्षादलाकडून जवळपास ९०० हून अधिक स्थानिक धर्मांध नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘आतंकवाद्यांप्रती सहानुभूती दाखवली’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यातील बहुसंख्य लोक बंदी घालण्यात आलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. हे लोक आतंकवाद्यांच्या ‘ओव्हरग्राऊंड वर्कर्स’ (ओ.जी.डब्ल्यू. – भूमिगत कार्यकर्ते) सूचीमध्ये आहेत. ते आतंकवाद्यांना विविध प्रकारचे साहाय्य करत असतात, उदा. रहाण्यासाठी घर उपलब्ध करून देणे इत्यादी. श्रीनगर, गांदरबल, बडगाम आणि दक्षिण काश्मीरच्या भागांतून या लोकांना कह्यात घेण्यात आले आहे. त्यांची आता चौकशी करण्यात येत आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !