|

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ६ दिवसांत काश्मिरी हिंदु आणि शीख नागरिकांची आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यानंतर सुरक्षादलाकडून जवळपास ९०० हून अधिक स्थानिक धर्मांध नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘आतंकवाद्यांप्रती सहानुभूती दाखवली’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यातील बहुसंख्य लोक बंदी घालण्यात आलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. हे लोक आतंकवाद्यांच्या ‘ओव्हरग्राऊंड वर्कर्स’ (ओ.जी.डब्ल्यू. – भूमिगत कार्यकर्ते) सूचीमध्ये आहेत. ते आतंकवाद्यांना विविध प्रकारचे साहाय्य करत असतात, उदा. रहाण्यासाठी घर उपलब्ध करून देणे इत्यादी. श्रीनगर, गांदरबल, बडगाम आणि दक्षिण काश्मीरच्या भागांतून या लोकांना कह्यात घेण्यात आले आहे. त्यांची आता चौकशी करण्यात येत आहे.
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !