इंदूर (मध्यप्रदेश) येथे बांगलादेशी मुलींना जाळ्यात ओढून भारतात वेश्याव्यवसायामध्ये ढकलणार्‍या बांगलादेशी घुसखोराला अटक !

  • २०० हून अधिक मुलींची फसवणूक !

  • ७५ मुलींना विवाह करून भारतात आणले !

  • बांगलादेशी घुसखोर भारतात घुसून अवैध कारवाया करत असतांना भारतीय यंत्रणा झोपल्या होत्या का ? – संपादक
  • अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर मुनीर उपाख्य मुनीरूल याला अटक केली आहे. तो बांगलादेशातील मुलींशी विवाह करून त्यांना भारतात आणून वेश्याव्यवसायात ढकलत होता. अशा प्रकारे त्याने ७५ हून अधिक मुलींशी विवाह केला, तर २०० हून अधिक मुलींना वेश्याव्यवसायामध्ये ढकलल्याचे उघड झाले आहे. या मुलींशी विवाह करून तो त्यांना भारतात आणत होता.

मुनीरूल बांगलादेश सीमेवरील पोरस येथून भारतात प्रवेश करून दलालांच्या माध्यमांतून देशात विविध ठिकाणी जात होता. या मुलींना कोलकात्यामध्ये काही काळ ठेवले जात होते आणि नंतर मुंबईमध्ये पाठवले जात होते. पोलिसांनी मुनीरूल याच्यासह अन्य काही जणांनाही अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी २१ बांगलादेशी मुलींची सुटका केली आहे.