भारत आणि अफगाणिस्तान विमान सेवा पुन्हा चालू करावी ! – तालिबान सरकारची भारताकडे मागणी

भारत सरकारने ही मागणी मान्य करू नये, असेच प्रत्येक भारतियाला वाटते ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने भारताच्या नागरी उड्डाण संचालकांना पत्र लिहून भारत आणि अफगाणिस्तान अशी विमान वाहतूक सेवा पुन्हा चालू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारताने १५ ऑगस्टपासून ही सेवा बंद केली आहे.