अटकेतील ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत जिहादी आतंकवाद नष्ट न केल्याचा परिणाम ! हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

नवी देहली – धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते, अशी धक्कादायक माहिती देहली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकत्याच अटक केलेल्या ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून उघड झाली. जान महंमद अली महंमद शेख उपाख्य समीर (वय ४७ वर्षे), उस्मान (वय २२ वर्षे), मूलचंद (वय ४७ वर्षे), झिशान कामर (वय २८ वर्षे), महंमद अबू बकर (वय २३ वर्षे) आणि महंमद आमिर जावेद (वय ३१ वर्षे) अशी अटक केलेल्या या ६ आतंकवाद्यांची नावे आहेत. यांतील जान महंमद अली महंमद शेख हा मुंबईच्या धारावी येथील रहिवासी आहे. तो मुंबई सेंट्रलवरून देहलीला रेल्वेने जात असतांना त्याला कोटा येथून अटक करण्यात आली. बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी या आतंकवाद्यांनी आणलेले दीड किलो स्फोटकेही पोलिसांनी जप्त केली आहेत. या आतंकवाद्यांच्या अटकेमुळे घातपाताचा मोठा कट उधळला गेला आहे.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !