जळगाव – तालुक्यातील अनेक गावांना ६ सप्टेंबरच्या रात्रीपासून चालू असलेला पाऊस आणि चक्रीवादळ यांनी झोडपले. यामुळे घरे आणि शेती यांची प्रचंड हानी झाली आहे. संसारोपयोगी साहित्याचीही हानी झाली. भागदरा या गावाजवळील तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले. शेतातील मका, कापूस यांसारखी पिके वाहून गेली. तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे २ गावांचा संपर्क तुटला असून गावातील २ जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. प्रशासनाने पहाणी केल्यानंतर हानीचे प्राथमिक अनुमान एका विवरणपत्राच्या माध्यमातून घोषित करण्यात आले. या विवरणानुसार जामनेर तालुक्यातील १७ गावांमध्ये हानी झाली आहे. यात हिंगणे, ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक, रामपूर, लहासर, ढालशिंगी, जुनोने, तळेगाव येथील घरांचे पत्रे उडाले असून काही घरांची पडझड झाली आहे. पहूर येथील काही दुकानांत पाणी शिरले, तर मेणगाव, टाकळी बुद्रुक, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी या गावांच्या शिवारातील पिकांची मोठी हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने आपल्या विवरणपत्रात नमूद केला आहे. शेतीची नेमकी किती हानी झाली, याची माहिती अजून प्राप्त झालेली नाही.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > अतीवृष्टी आणि चक्रीवादळ यांमुळे जामनेर (जळगाव) तालुक्यातील १७ गावे बाधित !
अतीवृष्टी आणि चक्रीवादळ यांमुळे जामनेर (जळगाव) तालुक्यातील १७ गावे बाधित !
नूतन लेख
- पुणे येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित रहाणार्या कर्मचार्यांवर कारवाई करणार ! – डॉ. सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी
- महाराष्ट्रात मतदानाच्या आवाहनासाठी निवडणूक आयोग घेणार प्रसिद्ध व्यक्तींचे साहाय्य !
- संपादकीय : बुडलेली दुबई !
- कर्तव्यतत्पर वीज कर्मचार्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने सत्कार !
- पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ !
- अयोध्येवर नैसर्गिक संकटे येत नव्हती ! – श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी