
कोल्हापूर, २७ एप्रिल (वार्ता.) – दळणवळण बंदी लागू झाल्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरीब, कष्टकरी, तसेच गरजू लोकांसाठी विनामूल्य शिवभोजन आधार ठरत आहे. जिल्ह्यातील ५ सहस्र ८३८ लोकांना हे भोजन सध्या ‘पार्सल’सेवेद्वारे विनामूल्य पुरवण्यात येत आहे. १४ एप्रिलपूर्वी ही संख्या सुमारे ४ सहस्र होती आणि केवळ ५ रुपयांत ते देण्यात येत होते. १४ एप्रिलनंतर ही संख्या प्रत्येक जिल्ह्यात दीडपट करण्यात आली आहे, तसेच ते विनामूल्य देण्यात येत आहे. सामाजिक अंतरांचे पालन करून हे शिवभोजन सध्या देण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांनी वाढ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !