स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र गेल्या वर्षापासून पहात आहे ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

जयंत पाटील, जलसंपदामंत्री

सांगली – स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र गेल्या वर्षापासून पहात आहे. केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असतांना महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर प्रशासन या संकटाला तोंड देत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या वक्तव्यातून केवळ महाराष्ट्रविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्णसंख्या, किती लसी उपलब्ध झाल्या याची शहानिशा न करता परिपत्रक काढून राज्याला अपकीर्त केले जात आहे, असे ट्विट राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.