मंदिरांचे सरकारीकरण हा हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रकार ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, द्वारकाशारदा आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

‘ज्या मंदिरांमध्ये अधिक प्रमाणात अर्पण येत आहे, अशीच मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. मंदिरांतून संतांना हटवून तेथे सरकारी अधिकारी आणले जात आहेत. आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे. एकीकडे मंदिरे अधिग्रहित केली जात असतांना दुसरीकडे मशिदी आणि चर्च यांना हात लावला जात नाही. चर्चना विदेशातून आणि मशिदींना आखाती देशांतून पैसा येतो; मात्र हिंदूंना कुठून पैसा येतो ? मंदिरांचे सरकारीकरण करणे, हा एक प्रकारे हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रकार आहे.’