(म्हणे) ‘भाजप सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित !’ – आम आदमी पक्षाची रिंकू शर्मा यांच्या हत्येवरून टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या त्यागपत्राची मागणी

  • केरळ, बंगाल आदी राज्यांतही हिंदू असुरक्षित झाले आहेत, त्याविषयी कधी आम आदमी पक्ष तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
  • देहलीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. राजधानीत समाजविघातक कारवाया करणारे रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोर अवैधपणे रहात असून त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याविषयी आपवाले कधील ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
सौरभ भारद्वाज

नवी देहली – देहलीतील कायदा आणि सुव्यवस्था वाईट झाली आहे. ती राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे. देशाची राजधानी देहलीमध्ये हत्येच्या घटना होणे ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. या हत्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तरदायी आहेत. भाजप सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केली.

देहलीच्या मंगोलपुरी भागात बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची धर्मांधांनी केलेल्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर भारद्वाज यांनी ही टीका केली.