कळमपुरी (जिल्हा हिंगोली) – येथील पालिकेच्या उद्यानामधील वाळलेल्या गवताला आग लागून १० फेब्रुवारी या दिवशी खेळण्याच्या साहित्याची अनुमाने ३ लाख रुपयांची हानी झाली आहे. पालिकेकडून बंद अवस्थेत असलेल्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती अभावी दुरवस्था झाली होती. काही जणांकडून उद्यान चालू करण्याचीही मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर पालिका प्रशासनाने या ठिकाणी कर्मचार्यांची नियुक्ती करून उद्यानातील स्वच्छता करण्यासाठी कर्मचार्यांच्या नेमणुका केल्या होत्या. हे कर्मचारी दुपारी जेवणासाठी गेल्यानंतर उद्यानातील वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. वार्यामुळे आग उद्यानाच्या मोकळ्या परिसरात पोचली. अग्नीशमन दलाच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
१५ दिवसांत एस्.टी.च्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाखांची वाढ !