कळमपुरी (जिल्हा हिंगोली) – येथील पालिकेच्या उद्यानामधील वाळलेल्या गवताला आग लागून १० फेब्रुवारी या दिवशी खेळण्याच्या साहित्याची अनुमाने ३ लाख रुपयांची हानी झाली आहे. पालिकेकडून बंद अवस्थेत असलेल्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती अभावी दुरवस्था झाली होती. काही जणांकडून उद्यान चालू करण्याचीही मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर पालिका प्रशासनाने या ठिकाणी कर्मचार्यांची नियुक्ती करून उद्यानातील स्वच्छता करण्यासाठी कर्मचार्यांच्या नेमणुका केल्या होत्या. हे कर्मचारी दुपारी जेवणासाठी गेल्यानंतर उद्यानातील वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. वार्यामुळे आग उद्यानाच्या मोकळ्या परिसरात पोचली. अग्नीशमन दलाच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली.
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस