
सातारा, ८ जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतीमध्ये २ सहस्र ८१३ प्रभागांतून ७ सहस्र २६६ उमेदवार निवडून देण्यासाठी १७ सहस्र ६५६ जणांनी अर्ज प्रविष्ट केले होते. छाननीच्या दिवशी जिल्ह्यातील २५२ जणांचे अर्ज बाद झाल्यामुळे ४ जानेवारी या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अनुमाने ९८ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत २ सहस्र ६३१ उमेदवार बिनविरोध झाले असून आता ६५४ ग्रामपंचायतीमध्ये ९ सहस्र ५२१ जण निवडणूक रिंगणात आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान होणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Bengaluru SIR : बेंगळुरूत ९७ लाखांपैकी ४ लाख मतदार अवैध!
भारतावर वाईट परिणाम करणारी खोटी कथानके !
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा ! – मुख्यमंत्री