उज्जैनमधील मुसलमानबहुल भागात हिंदूंनी आयोजित केलेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक !

  • भाजप शासित राज्यात अशा प्रकारची घटना होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने धर्मांधांवर वचक निर्माण केला पाहिजे !
  • गेली कित्येक शतके हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत. याचे कारण हिंदूंच्या वृत्तीत पालट झाला नाही. हिंदूंनी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले असते, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती !

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे २५ डिसेंबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जात असल्याच्या निमित्ताने अर्पण गोळा करण्यासाठी एका फेरीचे आयोजन केले हेते. त्यावर शहरातील बेगमबाग या मुसलमानबहुल भागात दगडफेक करण्यात आली. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला.

 (सौजन्य : MP News TV)

ही दगडफेक बराच वेळ चालू होती. येथील घरांच्या छतावरून धर्मांध महिला आणि लहान मुले हेही दगडफेक करत होती. नंतर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत ६ जण घायाळ झाले, तर काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी काही तरुणांना अटक केली आहे.