
मुंबई – कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडप्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकारांना म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या आरेतील जागेला मान्यता दिली आहे. यामुळे आता तरी ‘इगो’ सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. हिवाळी अधिवेशनातही मी हीच भूमिका मांडली होती; मात्र मुख्यमंत्री ‘मिठाचा खडा का टाकता ?’, असे म्हणाले होते; पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार-जीत करायला नको. मुंबईच्या विकासासाठी कामे करायला हवीत. मेट्रोच्या कामासाठी लागणारा पैसा हा जनता आणि सर्वांचाच आहे. कारशेडचे काम त्वरित चालू केले नाही, तर प्रकल्प वर्ष २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अट्टाहास का आहे ?’’
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम