
मुंबई – कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडप्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकारांना म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या आरेतील जागेला मान्यता दिली आहे. यामुळे आता तरी ‘इगो’ सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. हिवाळी अधिवेशनातही मी हीच भूमिका मांडली होती; मात्र मुख्यमंत्री ‘मिठाचा खडा का टाकता ?’, असे म्हणाले होते; पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार-जीत करायला नको. मुंबईच्या विकासासाठी कामे करायला हवीत. मेट्रोच्या कामासाठी लागणारा पैसा हा जनता आणि सर्वांचाच आहे. कारशेडचे काम त्वरित चालू केले नाही, तर प्रकल्प वर्ष २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अट्टाहास का आहे ?’’
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !